जत,प्रतिनिधी : केंद्र,राज्य शासनाकडून स्वस्तधान्य दुकानातून अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व केशरी कार्ड धारकांना सवलतीच्या दरात रेशनवरील धान्य देण्यास सुरवात केली आहे. तसेच पाच किलो प्रतिलाभार्थी मोफत तांदुळही दिले आहे.पण रेशनचे हे धान्य खरोखरच लाभार्थ्यापर्यंत पोहोचते का, हा संशोधनाचा विषय आहे. रेशनमधील गहू, तांदूळ आणि इतर गोष्टी सामान्य जनतेपर्यंत धान्य वाटप सुरू आहे. परंतू हे सर्व होत असताना काळे धंदे करणारेे
स्वस्तधान्य दुकानदार पुरवठा शाखेतील अधिकारी,स्थानिक नेते,समित्यांना हाताशी धरून रेशनवरील गहू आटा मिलपर्यंत पोहोचवून काळाबाजारात विकण्याचा प्रकार होत आहे.
जत पश्चिम भाग अशा तस्करीचे केंद्र बनले असून गेल्या आठ महिन्यात आलेल्या धान्यापैंकी तीस टक्के धान्ये कार्डधारकांना न देताच दुकानदारांनी काळ्या बाजारात विकल्याची चर्चा आहे.पश्चिम भागातील डफळापूर, बेंळूखी,बाज,अंकले,डोर्ली,कुडणूर,शिंगणा
कोणीही घराच्या बाहेर न येण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. त्यामुळे गरीब व हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य लोकांना एकवेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले होते,अशा वेळेत केंद्र व राज्य सरकारकडून गरीब,बेरोजगार नागरिकांना पोटाचे हाल होऊ नये म्हणून मोफत,व कमी दरांने गहू,तांदुळ,डाळीचे वाटप केले होते.मात्र अनेक दुकानदारांनी गरिबांच्या धान्यावर डल्ला मारल्याचे स्पष्ट होत आहेत. तर या सर्व प्रकाराला तालुका पुरवठा विभागाचा थेट पाठिंबा असल्याचे आरोप आहेत.