अहमदनगर- विजयपूर महामार्गाचे उर्वरित काम तातडीने सुरू करा | माजी आमदार विलासराव जगताप यांची मागणी

0
36



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील उमदीमधून जाणारा तसेच करमाळा,टेंभुर्णी, पंढरपूर,मंगळवेढा मार्गे जाणारा अहमदनगर- विजयपूर या राष्ट्रीय महामार्गाचे उर्वरित काम तातडीने सुरू करण्याची मागणी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. तसे त्यांनी मंत्री गडकरी यांना निवेदन पाठविले आहे. 




जत पुर्व भागातील अनेक गावातून जाणारा अहमदनगर-विजयपूरराष्ट्रीय मार्ग ( क्र.561)हा 298 कि,मी. चा असुन त्याचे काम बहुतांशी पुर्ण झाले आहे. त्यापैंकी महाराष्ट्र हद्दीमधील उमदी ते को.बोबलाद हा 36 कि. मी. व कर्नाटातील राज्यातील सिध्दापूर ते विजयपूर हा 18 कि. मी, असा एकुण 54 कि. मी. मार्ग अद्याप करण्याचा बाकी आहे.सदरचा महामार्ग अहमदनगर व विजयपूर या दोन ऐतिहासिक स्थळांना जोडला जाणार आहे.सध्या फक्त 54 सराव जगताप कि. मी. रस्ताच बाकी राहीलेला आहे. 




उर्वरित मार्गाचे काम झालेले आहे. तो लवकरात लवकर व्हावा अशी सर्वांचीच मागणी आहे. तसेच विजयपूर येथे इंटरनॅशनल एअर पोर्टचेही काम सुरु आहे. त्यामुळे सदरच्या रस्ताचे महत्व आपोआप वाढणार आहे.त्यामुळे राहीलेल्या 54 मी.रस्त्याचे काम डीपीआरसह त्वरीत मंजूर करुन हा उर्वरित रस्ता सिमेंट काँक्रीटचा करावा,अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here