जत,प्रतिनिधी : बोले तैसा चाले…. या उक्तीप्रमाणे गेली चाळीस वर्षे दुष्काळी जत तालुक्याचा कायापालट करण्यासाठी संघर्ष करणारे आमदार विलासराव जगताप यांनी पाच वर्षात कोट्यवधीची विकास कामे केली आहेत.या वचनपूर्तीचा लेखाजोखा ‘विकास रथयात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत आहोत.या रथयात्रेचे उद्घाटन डीपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाघमारे व भाजपचे कार्याध्यक्ष सुनील पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजाचे नेते मकसूद नगारजी, सलिम मणेर (चाचा), तम्मा सगरे, बाळू पाटील (कुंभारी), अरुण बिराजदर, जत शहराध्यक्ष अण्णा भिसे उपस्थित होते.या रथयात्रेद्वारे तालुक्यातील गावागावात जात या टिव्हीच्या माध्यमातून केलेल्या विकास कामे जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत.
आ.विलासराव जगताप यांच्या वचनपूर्तीचा लेखाजोखा ‘विकास रथयात्रेची सुरूवात करण्यात आली.





