देवनाळ पासून संखपर्यत पाणी पोहचविण्याचे नियोजन : आ.विक्रमसिंह सांवत
जत,प्रतिनिधी : देवनाळ तलाव क्रमांक 2 मध्ये पाणी सोडून सिध्दनाथ,संख,भिवर्गी तलावात नेहण्याचे नियोजन करण्यात आले आहे,अशी माहिती आमदार विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.
कृष्णा नदीच्या पुराचे पाण्याच्या नियोजना संदर्भात आ.सांवत यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला.
तालुक्यातील जास्तीत जास्त भागात हे पाणी पोहचवायचे आहे.देवनाळ तलावापर्यत,सनमडी भागातील उर्वरित कँनॉलचे काम तातडीने पुर्ण करण्याचे आदेश यावेळी आ.सांवत यांनी दिले.पुराचे पाणी जत तालुक्यात सोडावे यासाठी सातत्याने मागणी केली होती.त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर हे अतिरिक्त पाणी जत तालुक्याला मिळत आहे.तालुक्यातील शक्य तितके ओढे,बंधारे,तलावे,छोटे तलावे भरण्याचे नियोजन करण्यात यावे,त्याशिवाय देवनाळ,सनमडी पर्यतची रखडलेली कामे गतीने करून तेथून पाणी पोहविण्याचे आदेश आ.सांवत यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना दिले.
कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,बाबासाहेब कोडग,जलसंपदाचे शाखा अभिंयते अभिमन्यू मासाळ,मनोज कर्नाळे,जलसंधारणचे भिमाशंकर तेली उपस्थित होते.