सलग पाऊसाने जनजीवन विस्कळीत
जत,प्रतिनिधी : सलग तीन दिवसाच्या पाऊसामुळे जत तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.गेल्या पंधरवड्यात गायब झालेला पावसाने तीन दिवसापासून दमदार सुरूवात केली आहे.दिवसभर संततधार पाऊसाने खरीप पिकांना चांगला फायदा झाला आहे.मात्र सततच्या पावसाच्या सरीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)
जत शहरासह तालुक्यातील अनेक प्रमुख गावातील रस्ते राडेराड झाले होते.दिवसभर सतत पाऊसाच्या सरी कोसळत असल्याने व्यापारी पेठेत ग्राहक नसल्याने दुकानदाराचे नुकसान झाले आहे.