“बेफिकीर राहू नका,थेट संपर्क व सर्वच ठिकाणी सतर्क रहा” डॉ. रविंद्र आरळी यांना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले अनुभवाचे डोस
“बेफिकीर राहू नका,थेट संपर्क व सर्वच ठिकाणी सतर्क रहा”
डॉ. रविंद्र आरळी यांना पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले अनुभवाचे डोस
जत,प्रतिनिधी : बेफिकीर राहू नका,सतर्क राहवा,विजय मिळाला पाहिजे. असे सांगत जत शहर पिंजून काढलेले पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी नव्याने थेेेट निवडणूकीत उतरत राजकीय इंनिग सुरू केलेल्या डॉ. रविंद्र आरळी यांना अनुभवाचे चार शब्दं सांगताना सर्वाचे फोन नंबर ठेवा,फोनाफोनी
सतत राहू द्या,आ. विलासराव जगताप सह नेते कार्यक्रत्यांना,बरोबरींनी प्रचार यंत्रणा राबवा.भाजपला चांगले वातावरण आहे. नगराध्यक्ष सह बहुमताने सत्ता आली पाहिजे. त्यासाठी रात्रनंदिवस एक करा असे सल्ले देत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी काळजी करू नका,मीही तुमच्या प्रचारात आहे. असे उपदेशाचे धडे डॉ. आरळी यांना त्यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर जाताजाता दिले.