दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणारे नागरिक आपली वाहनेही बाजारपेठांतील रस्त्यांवर उतरवीत असल्याने बाजारपेठांत वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी ठरू लागली आहे. मेनरोडसारख्या वर्दळीच्या परिसरात मंगळवारी दुपारी तब्बल तासतासभर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सरसावलेल्या पोलिसाकडून मेनरोड परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने वाहतुकीस कारणीभूत ठरणाऱ्या बेशिस्त नागरिकांचे फावते आहे.त्यामुळे पोलीसांनी मुख्य बाजार पेठेत कारवाईचा बगडा उगारावा,अशी मागणी होत आहे.