कॉलेजभोवती रोडरोमिओंचा उच्छाद ! | जतेत एकादी निर्भया झाल्यावर पथक कार्यान्वित करणार काय पोलिस

0
जत : विद्यार्थिनींची छेडछाड करणे, त्यांचा विनयभंग करणे, त्यांच्याभोवती दुचाकी लावणे, त्यांना कट मारून जाणे असे प्रकार करीत शहरातील सर्वच महाविद्यालये, शाळांभोवती रोडरोमिओंनी उच्छाद मांडला आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी व रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘निर्भया’ पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.

 

मात्र जत पोलीसांचे पथक सध्या कोमात गेले आहेत. त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे.दोन वर्षे कोरोनामुळे बंद असलेले महाविद्यालये,ज्यू कॉलेज,माध्यमिक शाळा आता पुर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत.महाविद्यालये सुरू होताच कॉलेज व शाळांचा परिसर, बसस्थानक, बस थांबे येथे मुलींची रोडरोमिओंकडून छेडछाड तसेच अश्लील शेरेबाजी, मुलींना पाहून गाड्या जोरात दामटण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत.

 

 

मात्र, या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असून रोडरोमिओंवर खास लक्ष ठेवण्यासाठी नेमण्यात आलेले निर्भया पथक’ कायम कार्यरत राहणे गरजेचे आहे. त्यांच्याकडून अपेक्षीत कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थिंनींसमोर शिक्षण घेण्यासाठी कॉलेजला ये-जा करणे अवघड बनले आहे.पालकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांपूर्वीच शहरातील प्रमुख शाळा, कॉलेज सुरू झाली आहेत. शिक्षणानिमित्त महाविद्यालयात ये-जा करणार्‍या विद्यार्थिनींना व महिलांना रोडरोमिओंकडून अश्लील शेरेबाजी व हावभाव करून तसेच त्यांच्या मागेपुढे घुटमळत त्रास देण्याचा प्रकार होत आहे.

Rate Card
या गंभीर प्रकाराकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून यासाठी नेमण्यात आलेल्या ‘निर्भया’ हे पथक केवळ नावालाच आहे का, असा सवाल विद्यार्थिनी करत आहेत. रोडरोमिओंच्या त्रासामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. आपल्या मुलींना शिक्षणासाठी कॉलेजला पाठवायचे की नाही, असा मोठा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.

 

 

 

कॉलेज अथवा शाळेत गेलेली आपली मुलगी सुरक्षित घरी येईल किंवा नाही याबाबत पालकवर्ग खास करून महिलावर्ग कमालीचा चिंतीत असल्याचेही आढळून आले आहे.आम्ही ज्यावेळी काही कामानिमित्त बाहेर जातो त्यावेळी कॉलेजच्या परिसरात दुचाकींवरून मुलींची छेड काढण्याचे प्रकार दिसून येतात.त्यामुळे आम्हाला आमच्या पाल्यांना कॉलेजला पाठवायचे की नाही, आमच्या पाल्यांचे भविष्याचे काय, मुलींनी शिकावे की नाही, असे प्रश्न पडतात.आजही मुलींना शिकवणे खूप अवघड झाले आहे. कारण शासनाकडून बर्‍याच सुविधा मिळत आहेत.

 

 

मात्र, कॉलेजच्या परिसरात रोडरोमिओंकडून त्रास होतो. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष घालावे आणि तात्काळ रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा अन्यथा आमच्या पाल्यांचे भविष्य शिक्षणाअभावी वंचित राहतील अशी पालकांची मते आहेत.
टपोरी तरूणांचा उच्छांद
कॉलेज सकाळी 7 वाजता तर काही आकरा वाजता सुरू होतात. त्यापूर्वीच कॉलेजच्या रस्त्याला आणि गेटच्या आसपास परिसरातीलच काही मुले घुटमळत असतात. रस्त्यावरून ये-जा करताना आम्हाला छेडतात. आम्हाला पाहून  गाड्या जोरात मारणे, शिट्ट्या मारणे तसेच अश्लील भाषेत बोलतात. त्यामुळे आम्हाला कॉलेजला येणे खूपच अवघड झाले आहे,कॉलेज बंद होईल आम्ही घरी सांगत नाही,त्यामुळे टपोरीचा उच्छांद वाढला आहे,असे काही विद्यार्थींनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.