एकाच दिवशी एकाच वेळी ३६ कारागृहात विशेष कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत, राज्यातील ३६ प्रमुख कारागृहात सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने एक विक्रम केला आहे. “जीवन गाणे गातच जावे…” या विशेष कार्यक्रमाचे एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात कारागृहात आयोजन होण्याची ही घटना, देशाच्या व राज्याच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. व्यावसायिक कलाकारांसोबतच, कारागृहातील कैद्यांनीही या कार्यक्रमात सादरीकरण केले हे या कार्यक्रमांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य!