पर्यावरणाचा जागर अन् व्यवसाय, उद्योगाला स्टार्ट अप् ,सुमंगल लोकोत्सव

कोल्हापूर : पर्यावरण जागृतीचा जागर, सेंद्रिय शेतीचा प्रचार, पंचमहाभुतांच्या महतीचे सादरीकरण, स्वास्थ, शिक्षण आणि कृषी यांच्या आधुनिकीकरणासाठी दिली जाणारी माहिती याबरोबरच छोट्या-मोठ्या उद्योजक, व्यावसायिकांना आपला व्यवसाय व उद्योग वाढीसाठी मोठे व्यासपीठ ‘सुमंगलम लोकोत्सवा’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी तब्बल हजारावर स्टॉल उभारण्यात आले आहेत. शिवाय दहा हजारांवर व्यावसायिकांचे संमेलन होणार असून त्यांच्या अनुभवाची शिदोरीच नवउद्योजकांना मिळणार आहे.
रोज चार ते पाच लाख लोक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. यामुळे उत्पादनांना मोठा ग्राहकवर्ग मिळणार आहे. बचत गटाच्या महिलांनाही त्यांच्या वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीची सोय करून देण्यात आली आहे.
राजू लिंग्रज
सदस्य, संयोजन समिती
शेतकरी आणि सर्वसामान्य व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मोठी बाजारपेठ लोकोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. यामुळे यामध्ये सहभागी होणाऱ्या शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठी पर्वणी मिळणार आहे. जनजागृतीबरोबरच व्यवसायवृध्दीसाठी उपलब्ध करून दिलेली ही संधी आहे.
……………..