विजय ताड खूनप्रकरणी चार जणांना अटक,मुख्य सूत्रधार फरार

0

जत,संकेत टाइम्स : जत येथे भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खूनप्रकरणाचा मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी तीन सराईत गुन्हेगारांसह चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.मुख्य सूत्रधार उमेश सावंत फरार झाल्याने खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

याप्रकरणी बबलू ऊर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७,रा.समर्थ कॅलनी, जत), निकेश ऊर्फ दाद्या दिनकर मदने (वय २४, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), आकाश सुधाकर व्हनखंडे (वय २४, रा. सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (वय २७, रा.जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी,जत शहरात
शुक्रवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास जत-शेगाव रस्त्यावरील एका शाळेजवळ कारमधून निघालेल्या माजी नगरसेवक विजय ताड यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी कार अडवत गोळीबार केला.त्यानंतर ताड घराच्या दिशेने पळून जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. ते खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात गोळी झाडून तसेच डोक्यात दगड घालून त्यांचा निघृनपणे खून करण्यात आला होता.
या घटनेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली होती.घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ.तेली यांच्यासह एलसीबीच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देत तपास गतीमान केला होता.एलसीबीसह स्थानिक पोलिस ठाण्याची पथके हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आली होती.या घटनेचा कसून तपास केल्यानंतर सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ बबलू चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केल्याचे समोर आले.पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता.एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे गेल्या दोन दिवसापासून जतमध्ये ठाण मांडून होते.संशयित बबलू चव्हाण
हा कनार्टकातील गोकाक येथे असल्याची
माहिती खबऱ्याद्वारे पोलीसांना मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने गोकाक येथे छापा टाकून बबलू चव्हाणसह अन्य तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री उशीरा संशयितांकडे पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी कसून चौकशी केली.

 

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण | पालकमंत्री, माजी मंत्री,आजी-माजी आमदार उपस्थित रहाणार

त्यावेळी बबलू चव्हाण याने माजी नगरसेवक उमेश सावंत याच्या सांगण्यावरून हा खून केल्याची कबुली दिली.सर्व संशयितांना अटक करण्यात आली आहे.या खुनाचा मुख्य सूत्रधार उमेश सावंत याच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली आहेत.लवकरच त्याला अटक करू असे अधीक्षक डॉ.तेली यांनी सांगितले.

 

पोलिस अधीक्षक डॉ.बसवराज तेली
यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे
निरीक्षक सतीश शिंदे, जतचे निरीक्षक
Rate Card
राजेश रामाघरे, सहायक निरीक्षक प्रशांत
निशानदार, सहायक निरीक्षक संदीप शिंदे,
उपनिरीक्षक विशाल येळेकर, संदीप
नलवडे, प्रकाश पाटील, चेतन महाजन,
प्रशांत माळी, दीपक गायकवाड, कुबेर
खोत, सचिन धोत्रे, जितेंद्र जाधव,
आमसिद्धा खोत, संजय कांबळे, सोहेल
कार्तियानी, वैभव पाटील, उदय माळी
आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान या गुन्ह्याचा अधिक तपास
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे
करत आहेत.
संशयित तिघे रेकार्डवरील गुन्हेगार
पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. बबलू चव्हाण खुनाचा प्रयत्न,याच्यावर
मारामारी यासारखे ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.तर त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. निकेश मदने हाही सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, दरोडा, गंभीर दुखापत मारामारी असे चार गुन्हे दाखल आहेत.आकाश व्हनखंडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे.

 

संशयितांनी आठवडाभर केली होती
रेकी
विजय ताड यांचा खून करण्यापूर्वी संशयितांनी ताड यांच्या हालचालीची आठ दिवस रेकी केली होती.ताड यांच्या घराजवळ असलेल्या शाळेजवळ आठ दिवस ते फिरत होते. त्यावेळी शाळेच्या बस चालकाला त्याचा संशय आल्याने त्याने मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढले होते.पोलिसांच्या चौकशीत ते रेकॉर्डिंग पुढे आले. त्यामुळे हा खून संशयित बबलू चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली होती.खुनानंतर दोनच दिवसात हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.खून प्रकरणात उमेश सांवत यांचे मुख्य सूत्रधार म्हणून नाव पुढे आल्याने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.