चुकीच्या फोन कॉलच्या गैरसमजूतीतून 7 जणांना मारहाण केल्याप्रकरणी 7 जणावर गुन्हा दाखल

0
ऊसतोडीची उचल किती पाहिजे असा फोन करत असताना भलत्याच व्यक्तीला फोन लागला.आम्हाला कशाला ऊस तोडी उचल हवी आहे असा जाब विचारत गैरसमजूतीतून एका गटाने फोन लावलेल्या एकावर कोयता,कुऱ्हाड, लोखंडी गजाने हल्ला करून जिमी केल्याची घटना धुळकरवाडी (ता.जत) घडली आहे.यात अकाराम कृष्णा करे (रा.धुळकरवाडी) गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.हा खुनी हल्ल्याची फिर्याद निलाबाई रामा माने यांनी उमदी पोलिसात दिली आहे.
सोमवार सकाळी ११ वाजता कागणरी येथील मेडीदार यांच्या अंगणात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी सुरेश धोंडीबा करे, उमेश सुरेश करे, संतोष शिवाजी करे, बबन नारायण करे, सुनील सुरेश करे, भाऊसाहेब नारायण करे, रमेश सुरेश करे या ७ जणांवर पोलीसांनी गुन्हा केला आहे.
या हल्ल्यात आकाराम कृष्णा करे, दादू कृष्णा करे, परमेश्वर कृष्णा करे, गणपती कामांना करे , उजया जयाप्पा पांढरे, संजय रामा माने, बिराप्पा जायप्पा पांढरे (सर्व रा. धुळकरवाडी) असे ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलीसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी, धुळकरवाडी येथील आकाराम करे हे ऊस तोड टोळीचे प्रमुख आहेत.
विविध साखर कारखान्याना मजूर पुरवतात.सोमवारी सकाळी कागणरी येथील मेडीदार नामक व्यक्तीच्या घरासमोर ते होते. त्यावेळी त्यांनी सुरेश लमाण यांना ऊसतोडी उचल हवी आहे का ?,असा फोन करायचा होता .परंतु हा फोन चूकून कॉल  संशयित आरोपी गटातील रमेश सुरेश करे यांना लागला.

त्यांनी त्यांना ऊसतोड पाहिजे काय असे विचारले असता,आम्हाला कशाला ऊस तोडीची उचल हवी आहे असा जाब विचारात कागणरी येथील मेडीदार यांच्या घरासमोर सुरेश करे यांनी व त्यांच्यासोबत आलेल्या ६ जणांनी आकाराम करे यांच्यावर कुऱ्हाड, लोखंडी गजाने खुनी हल्ला केला.यात त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.या घटनेची उमदी पोलिसात नोंद असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात करत आहेत.जखमीवर उपचार सुरू आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.