सावंत म्हणाले,गेल्या साडेतीन वर्षात तालुक्यातील विज समस्या, कृषी आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांसाठी सरकारकडे भांडून प्रश्न मार्गी लावले आहेत. जलसंपदा विभागाशी संपर्क करून वारंवार म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले. याशिवाय विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करत आहोत.जनतेने विरोधकांचे मनसुबे ओळखले आहे. त्यामुळे आता त्यांनी नौटंकी थांबवावी,असेही आ.सावंत म्हणाले.