राज्यातील एक लाखाहून अधिक युवा प्रशिक्षणार्थी यांना संघर्षानंतर पाच महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. परंतु सद्यस्थितीत युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. संभाजीनगर जिल्ह्यात मुदतवाढ शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे मात्र राज्यातील ३५ जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही? शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे नितांत गरजेचं आहे. येत्या मंगळवारी २२ एप्रिल पर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशिक्षणार्थी समवेत आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे मुख्य समन्वयक तथा श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्याचे सर्वेसर्वा ह.भ .प. बाबा तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आले. यावेळी ह भ प तुकाराम बाबा महाराज यांच्या समवेत युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
तुकाराम बाबांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या विविध मागण्यासाठी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना रस्त्यावर उतरणार आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीचे पाच महिने कार्यकाळ वाढला असून अध्याप संपूर्ण राज्यात संभाजीनगर वगळता कोणत्याच जिल्ह्यात शासन निर्णयाची परिपूर्ण अंमलबजावणी केली जात नाही. प्रशिक्षणार्थींना कामावर रुजू करून घेतले जात नाही. प्रशासन दुजाभाव करत आहे ही वस्तुस्थिती आहे. याबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तर दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व बाबी संदर्भात जिल्हाधिकारी सांगली व कौशल्य विभाग आयुक्त यांच्या निदर्शनास आणला आहे. या निवेदना नंतरही योग्य कार्यवाही न झाल्यास मंगळवारी पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे.
ह भ प तुकाराम बाबा महाराज म्हणाले, शिक्षण विभाग वगळता इतर सर्व विभागातील प्रशिक्षणार्थींना १० आणि ११ मार्च शासन निर्णयानुसार कॅन्टीन्यू करण्यात आलेले आहे,संपूर्ण राज्यात प्रशिक्षणार्थींना वय ३५ किवा त्यापेक्षा जास्त झाल्याने प्रशासन पुढील ५ महिन्यासाठी नियुक्ती देण्यासाठी नकार अथवा अडथळे निर्माण करीत आहे,राज्यात ६ महिने पूर्ण होऊन सुद्धा सर्वच विभागातील अनेक प्रशिक्षणार्थींची नावे आजही ऑनलाईन दिसत नाही आणि त्यामुळे त्यांना एकाही महिन्याचे मानधन मिळाले नाही. त्यांना ती नावे ऑनलाईन करण्यासाठी तो टॅब उपलब्ध करून द्यावा. त्यांची नावे ऑनलाईन करून घेण्यात यावी. उदा.जळगाव मधील काही शिक्षक प्रशिक्षणार्थी राज्यभरात आजही अनेक प्रशिक्षणार्थींचे काहींचे २ महिन्याचे,३ महिन्याचे अशे मानधन बाकी आहे.तरी ते मानधन तत्काळ अदा करावे,
आधार व्हेरिफिकेशनची मुदत किमान १ महिना वाढवून ३१ मे पर्यंत करावी,मानधन वेळेवर अदा करावे,राज्यभरात सर्व प्रशिक्षणार्थींना आयकार्ड देण्यात यावे. या मागण्या मान्य कराव्यात . अन्यथा न्याय व हककासाठी रस्त्यावरील लढाई करावी लागणार आहे.
सांगलीत मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी यांच्या दुग्धभिषेक नंतर ही नाराजीची वेळ..
८ मार्च रोजी सांगलीत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना मुदतवाढ देण्याच्या शासन निर्णयानंतर जल्लोष साजरा केला. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला. यावेळी हभप तुकाराम बाबा महाराज यांचा लढयास बळ देत लढा यशस्वी केल्याबद्दल जंगी सत्कार करण्यात आला.मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने प्रशिक्षणार्थी यांच्यात प्रचंड नाराजी आहे. मुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.