राजारामबापू 4 थ्या युनिटच्या हंगामाचा शुभारंभ
जत,प्रतिनिधी : जत येथील राजारामबापू पाटील सह.साखर कारखान्याच्या 4 थ्या युनिटच्या गाळप हंगामाचा शुभारंभ चेअरमन पि.आर.पाटील यांच्याहस्ते झाला.
जत साखर कारखाना राजारामबापू कारखान्याने विकृत घेतला आहे.गेली अनेक वर्ष बंद असलेला कारखाना अखेर सुरू करण्यात आला आहे.
तालुक्यातील वाढलेले ऊसाचे क्षेत्र यामुळे कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता झाली आहे.या युनिटमधून 3 लाख टन गाळपाचे उदिष्ट असल्याची माहिती यावेळी पि.आर.पाटील यांनी दिली.तसेच स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.