जत : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील एकुंडी येथे प्रेमी युगलानी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अश्विनी गजानन माळी (वय २२) आणि लक्ष्मण संभाजी शिंदे (वय २१) असे प्रेमी युगलाची नावे आहेत. दोघांनीही एकुंडीतील आपपल्या घरात विष प्राशन करुन आत्महत्या केली. जत पोलीस ठाण्यात दाेघांच्या आत्महत्येची नोंद केल्याची माहिती पाेलीसांनी दिली.
या घटनेबाबत पाेलीसांकडून मिळालेली माहिती अशी : अश्विनी माळी ही मूळची सरगरे येथील असून सध्या ती एकुंडी येथे राहण्यास आहे. एकुंडी येथील लक्ष्मण शिंदे याच्याबरोबर तिचे प्रेम संबंध होते. तिचा एक जूनला विवाह झाला हाेता. ती मिरज येथून एकुंडी येथे दोन दिवसांपूर्वी आली होती.
सोमवारी दुपारी अश्विनी व लक्ष्मण या दाेघांनी एकत्र विषारी औषध प्राशन केल्याचा अंदाज पाेलीसांनी वर्तविला आहे. दाेघांनाही अस्वस्थ जाणवू लागल्याने त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात आणले. तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला