टीव्‍हीवर येण्‍याची वाट पहा

0


बॉक्स ऑफिसवर आज आणखी एक चित्रपट झाला आहे. तो म्हणजे बॉलीवूडचा मुन्नाभाई संजय दत याचा कमबॅक चित्रपट ‘भूमी’. ‘भूमी’चे दिग्‍दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. तर जाणुन घेऊ यात कसा बनला आहे संजय दत्तचा भूमी हा चित्रपट.

चित्रपटाची कथा ही उत्‍तर प्रदेशात आग्रा येथे राहणा-या एका वडील आणि त्‍याच्‍या मुलीबद्दल असून अरुण सचदेव (संजय दत्‍त) त्‍याची मुलगी भूमीसोबत (आदिती राव हैदी) राहत असतो. चपलांचे अरुणचे दुकान असते. भूमी आणि निरज (सिद्धांत गुप्‍ता) यांचे एकमेकांवर प्रेम असते आणि लवकरच ते दोघेही लग्‍न करणार असतात. सर्वकाही सुरळीत सुरु असताना या बापलेकीवर धोली (शरद केळकर) नावाच्‍या व्हिलनमुळे मोठे संकट येते. भूमीवर धोलीची गँग रेप करते. भूमी आणि अरुणचे जीवन त्‍यामुळे पूर्णपणे बदलून जाते. ते न्‍यायासाठी पोलिस ते कोर्ट सगळीकडे चकरा मारतात. पण त्‍यांना याबाबत न्‍याय मिळतो का? शेवटी न्‍यायासाठी अरुण आणि भूमी काय करतात? या प्रश्‍नांची उत्‍तरे मिळवण्‍यासाठी तुम्‍हाला चित्रपटच पाहावा लागेल.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.