जत शहर पुन्हा राडेराड | चालणेही जिकिरीचे बनले : कधी बदलणार ही परिस्थिती
जत : जत शहरात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहर पुन्हा राडेराड झाले आहे.किरकोळ पावसात जतची होणारी अशी अवस्था बदलण्यासाठी नगरपरिषदेकडून ठोस उपाययोजना झाल्या नाहीत.त्यामुळे शहरातील रस्त्यावरील चिखल,दलदल कायम आहे.
नगर परिषद झाल्यापासून शहरातील रस्त्याची दुरावस्था कायम आहे.किरकोळ कामे वगळता रस्त्याची कामे झाली नाहीत.शहरातील प्रमुख मार्ग असणाऱ्या गुहाघर-विजापूर रस्त्याचे काम अडखळत सुरू आहे,ते पुर्ण होण्यासाठी अजून किती महिने लागतील हे सांगता येत नाही.
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)
गेल्या दोन दिवसापासून शहरात पडत असलेल्या पावसामुळे शहरात पुन्हा राडेराड परिस्थिती झाली आहे.त्यामुळे शहरातील रस्त्यावरून फिरणेही जिकिरीचे बनले आहे.