विद्युतपंप चालू करायला गेलेल्या तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू,वाचा कुठे घडली घटना..

0

तरूण शेतकऱ्यांचा पाय घसरून विहिरीत‌ पडल्याने मृत्यू झाल्याची घटना जत तालुक्यातील कोसारी येथे घडली आहे.रामचंद्र आनंदा वाघमोडे (वय.२१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.रामचंद्र हा गुरूवारी (ता.२३)सकाळी १० वाजता विद्युत पंप चालू करायला विहिरीवर गेला होता.घटनेची नोंद जत पोलिसात झाली आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कोसारीत घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर रामचंद्र वाघमोडे यांच्या
शेतात विहीर आहे.नेहमीप्रमाणे रामचंद्र हा लाईट आहे म्हणून रामचंद्र गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी विहिरीवर गेला होता.मात्र तो बराच वेळ झाला तरी तो घराकडे आला नाही.त्यामुळे रामचंद्रचे वडील आनंदा वाघमोडे हे विहिरीवर गेल्यावर त्यांना विहिरीच्या काठावर रामचंद्र यांची चप्पल पडलेली दिसली.त्यानंतर त्यांनी विहिरीच्या आसपास शोधाशोध केली.

 

दरम्यान रामचंद्र यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला.पोहता ‌येत नसल्याने रामचंद्र यांचा बुडून मृत्यू झाला.तोल जावून विहिरीतील दगडावर पडल्याने रामचंद्र यांच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

 

Rate Card

हेही वाचा-

नवऱ्यांचा नादचं खुळा,बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटीलची लावणी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.