कष्टकरी वर्गामुळे राज्याची प्रगती होत असते

0
106

काँग्रेस पक्षामुळे महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली..

  • – पृथ्वीराज पाटील

सांगली : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि त्याची चौफेर प्रगती ही काँग्रेस पक्षामुळे झाली आहे.महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आता पर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि जागतिक स्तरावर कामगार लढ्यात शहीद सर्वांना अभिवादन करु या. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान आणि मराठी माणूस आणि मराठी भाषा यांना एकत्र आणून राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी नेटाने पार पाडू या असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. काँग्रेस भवनासमोर त्यांच्या हस्ते महाराष्ट्र व कामगार दिनी ध्वजवंदन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

प्रारंभी वंदे मातरम, राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात आले. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महानगरपालिका सफाई कर्मचारी गौराबाई दुंडाप्पा मनचंद यांचा बक्षिसी व शाल देऊन सत्कार केला.

यावेळी महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या व सांगली जिल्हा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष स्वामी रामानंद भारती यांच्या जयंतीनिमित्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभागाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे, काँग्रेस सेवा दल जिल्हाध्यक्ष अजित ढोले,कार्याध्यक्ष अनिल मोहिते पाटील व
अरुण पळसुले,काँग्रेस इंटकचे डी. पी. बनसोडे,रामसिंग परदेसी,सिद्राया गणाचार्य,विठ्ठलराव काळे,
प्रतिक्षा काळे,जिल्हा काँग्रेस सचिव सचिन चव्हाण,
गणेश वाघमारे, प्रथमेश शेटे व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते



Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here