गलाई व्यवसायिकाचा खून | खानापूर तालुक्यातील माधळमुठी येथील घटना

0

विटा : खानापूर तालुक्यातील माधळमुठी 

येथील गलाई व्यवसायिकाचा आर्थिक व्यवहारातून निघृण खून झाल्याची घटना घडली आहे.शनिवारी रात्री हा प्रकार घडला. महादेव रघुनाथ माळी (वय 29) असे खून झालेल्या गलाई व्यवसायिकाचे नाव आहे.या खूनप्रकरणी दुसरा गलाई व्यवसायिक राहूल किसन माळी याला  (ता.खानापूर)याला विटा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.व्यावसायिक भागीदारीतून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


Rate Card



पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उत्तर प्रदेश येथे गलाई व्यवसायात पार्टनरशिपमध्ये असणाऱ्या महादेव माळी आणि राहुल माळी यांच्यात मतभेद झाले होते.त्यातून शनिवार 18 जुलै रोजी झालेल्या वादावादीत राहुल माळी या गलाई व्यावसायिकाने महादेव माळी या गलाई व्यवसायिकाच्या घरी जाऊन त्यांच्यावर कोयत्याने धारदार शस्त्राने हल्ला केला.त्यात छातीत वम्री घाव लागल्याने त्यांचा विटा येथे उपचार्थ नेहत असताना त्यांचा वाटेत मुत्यू झाला.या घटनेनंतर आरोपी राहुल माळी हा पळून जाताना विटा पोलिसांच्या पथकाने राहुल माळीला लेंगरे येथून ताब्यात घेतले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.