दिशाहीन समाजाल वठणीवर आणणार कोण?

0

दिशाहीन समाजाल वठणीवर आणणार कोण?

सध्या अनेकांना या देशाचे कसे होणार असा प्रश्न पडला आहेत्यामुळे त्यांचा त्रागा होत आहेसांगायचे कुणालाअसा सवाल त्यांच्यापुढे असून सगळेच माळेचे मणी आहेतअसा प्रत्ययही त्यांना येत आहेघराबाहेर पडल्यापासून त्यांना अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे,ज्यामुळे त्यांना देशाची चिंता वाटते आहेरस्त्यावरून चालण्यापासून ते कार्यालयातल्या कामापर्यंत सगळीकडे त्यांना वाढत चाललेला बेजबाबदारपणाहरवत चाललेली नीतीमत्ता,मूल्यशिक्षणाचा अभाव आणि सामाजिक जाणिवांचा विसर यामुळे आदर्शहीन बनलेल्या समाजाला आदर्शाचा पाठ कसा शिकवायचा असा प्रश्न त्यांना पडला आहेदेशात सुजाण नागरिकांची संख्या दुर्मिळ होत चालली असल्याचा त्यांचा दावा असून या धक्कादायक परिस्थितीमुळे ती मंडळी अगदी कासाविस झाली आहेत.

अशा दिशाहीन आणि आदर्शहीन समाजाला कोण चांगुलपणाची वाट दाखवणारअसा प्रश्नही त्यांना पडला आहे.रस्त्यावरून चालताना किंवा गाडीवरून जाताना अचानक मोठमोठा हॉर्न करत तरुण पोरं मागून झपकन पुढे जातात,तेव्हा यांच्या काळजात धस्स होतंहॉर्नच्या आवाजाने कान बधीर होतात.चक्कर येऊन खाली कोसळतोय की कायअसेच वाटून जातेखरे तर आजच्या पिढीने दुसर्यांची काळजी करायला हवीयासाठी स्वतला एक शिस्त लावायला हवी,असं त्यांना वाटतंव्यक्तिगत व सामाजिक आरोग्यवाहतुकीचे नियमसावर्जनिक ठिकाणची स्वच्छताआपत्ती व्यवस्थापन अशा किती तरी गोष्टींची काळजी घ्यायला हवीअसे करणाराच एक सजग आणि सुजाण नागरिक समजला जातोसमाज माझ्यासाठी काय करतोयापेक्षा आपण समाजासाठी काय केले पाहिजेया गोष्टींकडे लक्ष देणारा नागरिक घडायला हवा आहेकायद्याने घालून दिलेल्या बंधनाचे पालन प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने करायला हवेअसे त्यांना वाटते.आदर्शाच्या कल्पना काळपरिस्थितीदेशानुरुप बदलतातप्रत्येकाने कायद्याचे पालन करताना सार्वजनिक जीवन जगताना जे स्वत:ला हक्क आहेत ते इतरांना देखील आहेत,याची जाणीव ठेवून इतरांच्या हक्कांवर अतिक्रमण होणार नाही,याची काळजी घेणारा नागरिक घडणार काअसा सवालही त्यांचा आहे.

आपल्या लोकांना देशसेवा,भक्ती म्हणजे काय असते,याचीही जाणीव करून द्यायला हवी आहेकेवळ सीमेवर जाऊन शत्रूशी युद्ध करणेअतिरेक्यांशी लढणे यालाच देशभक्ती म्हणत नाहीतहे कुणीतरी सांगायला हवे आहेवाहतूक नियमांचे पालन करणेदेशाप्रती आपल्या कर्तव्याची जाण ठेवणेवडिलधार्यांचा आदर करणे आणि स्वत:शी आणि देशाशी प्रामाणिक राहणेही मूल्ये जोपासली गेली तरच खर्या अर्थाने राष्ट्रभक्ती ठरणार आहेआपल्याला मिळालेल्या नैसर्गिक देणग्यांच्या वापर करायला शिकले पाहिजेबुद्धिमत्ताविचारशक्तीभावना या मनुष्याला मिळालेल्या नैसर्गिक देणग्या आहेतत्यांचा वापर योग्यवेळी करणे अपेक्षित आहेपरंतु ही नैतिक मूल्ये सद्याच्या परिस्थितीत पाळली जात नाहीत.

Rate Card

आपल्या शिक्षणाचाअनुभवाचा आणि कौशल्याचा चांगल्यासाठी वापर झाला पाहिजेम्हणजे हा वापर थेट देशासाठीच होतोहे ध्यानात घेतले पाहिजे.भ्रष्टाचारकामात चालढकलपणा या गोष्टी स्वत:च्या र्हासाला कारणीभूत आहेतअसेच चित्र राहिले तर भावी पिढीसाठी हे फारच वाईटचिंताजनक असणार आहेसमाज अधोगतीला चालला आहेतो सुधारण्याची आवश्यकता आहेयासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजेचुकणार्याला सामुहिकरित्या समजावून सांगितले पाहिजेकारण आजच्या काळात कुणाला चांगले सांगितलेले रुचत नाहीसांगणार्याचीच अवस्था वाईट होतेका सांगायला गेलोअसे काहींना झाल्याचे सांगितले जाते.

 आपले गावपरिसरराष्ट्र सुसंस्कृतशीलसंपन्न वगैरे व्हावेअसा वाटणार्यांची संख्या वाढायला हवीविवेकानेसंयमानेदैर्याने प्रश्नांना सामोरे जाणारा नागरिक बनायला हवा आहेतरच समजदार नागरिक तयार होतीलअसे शिक्षण घराघरांतून द्यायला हवे आहेमानवी मनावर बालपणापासून संस्कार व्हायला हवेतयाची सुरुवात घरातूनच व्हायला हवीअसे म्हणूनच त्यांना वाटतेलहानपणी आपले पालकच आपले आदर्श असतातते जसे वागतील तसे मुलांवर संस्कार होतातरस्ता ओलंडतानासार्वजनिक स्थळी वागताना घरातील वरिष्ठ जसे वागताततशीच सवय मुलांना लागते.यामुले घरातूनच योग्य संस्कार ,वर्तनसवयी लावण्यासाठी पालकांनी काळजी घ्यायला हवीअसे काहीजणांना वाटते.अर्थात हे काहीजणही फारच थोडे म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत.त्यामुळेच साहजिक बहुमताचे पारडे ज्याच्याकडे त्यांचेच समाज अनुकरण करणार ना?

मच्छिंद्र ऐनापुरे,जत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.