रशिया- युक्रेन युद्धाने संपूर्ण जगाला त्याची झळ बसत आहे शिवाय अनेक भारतीय विद्यार्थी व विद्यार्थिनी तेथे अडकलेल्या आहेत. या मुलांना स्वगृही आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या संपर्कात राहायचं व त्या विद्यार्थ्यांच्या घरच्यांचे सांत्वन करावयाचे या दोन्ही गोष्टी करीत असताना खूप धीर धरावा लागत होता. मात्र आज तालुक्यातील विद्यार्थिनी घरी आल्याने केलेल्या कामाचे चीज झाले असे मनोमन वाटतंय,असे उद्गार यावेळी आ.लाड यांनी काढले.