सांगली जिल्ह्यातील २ लाख ४० हजार ६२३ शेतकऱ्यांकडे एकूण १२८६ कोटी ४२ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून निर्लेखन तसेच व्याज व दंड माफी आणि वीजबिल दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकऱ्यांकडे आता १०२५ कोटी ४३ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या दि. ३१ मार्च २०२२पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी म्हणजे ५१२ कोटी ७१ लाख रुपये माफ होणार आहे व वीजबिल देखील संपूर्ण कोरे होणार आहे.
आतापर्यंत १ लाख २० हजार ४५८ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी १७६ कोटी ३२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण १८० कोटी ९४ लाख रुपये माफ झाले आहेत.
Prev Post
फँबटेक मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसायटी जतमधिल छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांचा आर्थिक आधार ठरेलं
Next Post