लोकसभेच्या ६ जागा हा पक्ष लढविणार | कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन
कोल्हापूर: लोकसभा निवडणूकीचे ढोल वाजत असताना राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभेच्या सहा जागा लढविणार घोषणा केली आहे.सहाही ठिकाणी स्वबळावर लढणार आहोत. कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीने तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोकणातील आंबा (ता. शाहूवाडी) येथे स्वाभिमानीने आयोजित केलेल्या कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप झाला. त्याप्रसंगी शेट्टी बोलत होते.
