मिरजेजवळ भिषण अपघात,पाच जण जागीच ठार

0

मिरज : राधानगरी ‌तालूक्यातील सातजण बोलेरो मधून सोलापूरच्या दिशेने जात असताना मिरजेजवळ कोल्हापूर – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवर जीप व विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची भिषण धडक होऊन झालेल्या अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. राधानगरीजवळच्या सरवडे येथील राहणारे सर्व मृत आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलीसाकडून तपास सुरू झाला आहे.

Rate Card
पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील सातजण राष्ट्रीय महामार्गावरून बोलेरो वाहनामधून सोलापूरकडे निघाले होते.मिरज जवळ आले असता रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर आणि बोलेरोमध्ये समोरासमोर भिषण धडक झाली.बुलेरो थेट ट्रॅक्टरमध्ये घुसली.या भिषण अपघातात जीपमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे मिरजेतून जाणारा रत्नागिरी ते नागपुर हा मिरजेतील रस्त्याचा बायपास रस्ता दोन दिवसापूर्वीच सुरु करण्यात आला आहे.

 

या बायपास रस्त्यावर राजीव गांधी नगर येथे आज बुधवारी सकाळी १०.०० वाजता बुलेरोची ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.त्यात पाच जणांचा जागीच मृत्यु झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.जीपमधील चालकासह ३ पुरुष एक महिला व एका १२ वर्षाचा मुलगा असा पाच जणाचा जागीच मृत्यू झाला आहे.मृत सर्वजण हे राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील आहेत.जिपमधिल अन्य तीघेजण जखमी झाले असून त्यातील एका जखमी महिलेची प्रकृती गंभीर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.