अथणीत काट्याची टक्कर | माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदींचे भाजपला ओपन चँलेज

0

जत : ऐनवेळी भाजपचे स्टार नेते असलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हाताच्या चिन्ह घेऊन मैदानात उतरले आहेत.भाजपाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे अख्ख्या कर्नाटकातील भाजपच्या निशाण्यावर असलेला अथणी मतदार संघात काट्याची लढत होत आहे.

Rate Card
माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी थेट भाजपा नेत्यांना आवाहन देत’हिंमत असेल तर मला पाडून दाखवा’अशी घोषणा केली आहे.येथे भाजपचे विद्यमान आमदार महेश कुमठळ्ळी यांच्याशी सवदी यांची तुल्यबंळ लढत होत आहे.
संपूर्ण कर्नाटक राज्याला नेत्यांचे पक्षांतर नवीन नाही. २०१८ मधील विधानसभा निवडणुकीत महेश कुमठळ्ळी यांनी काँग्रेसच्या तिकिटावर तेव्हाच्या भाजपचे उमेदवार लक्ष्मण सवदी यांना फक्त २००० मतांनी पराभूत केले होते.राज्यातील कॉग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपने काँग्रेसच्या १७ आमदारांना फोडले. त्याचवेळी या १७ आमदारांना २०२३ मधील उमेदवारी द्यायचा वायदा भाजपने केला होता. त्यानुसार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या कुमठळ्ळी यांना भाजपाने मैदानात उतरविले आहेत.त्यामुळे लक्ष्मण सवदी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पाण्याचे राजकारण अथणी मतदारसंघात सिंचनाचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.सिंचनाअभावी तालुक्यातील जवळपास ४० टक्के कोरडा राहिलेला आहे.महाराष्ट्रातून आलेल्या कृष्णा नदीचे पात्र फेब्रुवारी ते मे यादरम्यान कोरडे पडलेते.त्यामुळे या भागाला पाण्याची टंचाई भासते.महाराष्ट्रातील कोयना धरणातून ४ टीएमसी कर्नाटकसाठी सोडावे अशी मागणी कर्नाटकाकडून सातत्याने होते. त्यासाठी लागणारी रक्कम भरण्याची तयारी आहे, असे सांगितले जाते.मात्र महाराष्ट्रातून जेवढे पाणी सोडले जाते त्यातील २ टिएमसी पाणी विजापूर जिल्ह्यातील तुबची-बबलेश्वर योजनेतून महाराष्ट्रातील जतच्या पूर्व भागाला पाणी द्यावे असा प्रस्ताव आहे, मात्र त्यावर अनेक वर्षापासून कार्यवाही झालेली नाही. परिणामी दरवर्षी अथणी तालुक्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.उन्हाळ्यातील चार महिने शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते.
बेळगाव जिल्हा विभाजनाकडे दुर्लक्ष

बेळगाव जिल्ह्यात विधानसभेचे तब्बल १८ विधानसभा मतदारसंघ आहेत.जिल्हा विस्ताराने खूप मोठा आहे. अथणीपासून बेळगावचे अंतर १५० किलोमीटर आहे.
बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतु राजकारणात हे घोंगडे भिजत पडले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.अथणी मतदारसंघाचे जवळच्या सांगलीशी बाजारपेठ, पै-पाहुणे या माध्यमातून जिव्हाळ्याचे संबंध आहेत.अथणीकरांचा सांगलीशी मोठा संपर्क असतो.


२०१८ ला विधानपरिषद मिळाली मात्र,
दरम्यान २०१८ मधील पराभवानंतर लक्ष्मण सवदी यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवले होते,ते मंत्रीही होते. परंतु ते आता विधानसभेची उमेदवारी मागत होते. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सवदींनी ऐनवेळी थेट काँग्रेस गाठून तिकीट मिळवले. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.त्यामुळे राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी अथणी मतदारसंघ लक्ष्य केला आहे.लक्ष्मण सवदीना रोकण्याचे सर्व पर्याय वापरले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.